अकोल्यात बनावट बियाण्यांमूळ फसवणूक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत मोठी वाढ झाली आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेकडो एकरातील सोयाबीन आणि तुरीचे बियाणे लागवड करून उगवलंच नाहीये. बनावट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून पातूर तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सारस 335 या कंपनीच सोयाबीन बियाणं लागवड केल होत. अनेकांनी 20 ते 21 जून दरम्यान शेतात पेरणी केली. अनेक दिवस उलटले, पाऊस चांगला झाला. मात्र, त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवल नाही. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आता कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचला आहे, आणि पंचनामे सुरु केले असून सारस 335 कंपनीच सोयाबीन बियाणं देखील ताब्यात घेत प्रयोग शाळेत तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केला जाईल असा कृषी अधिकार्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.