मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे केवळ १६ महिन्याच्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला आहे. नायगावच्या चिंचोटी इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या बालकाला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार रुग्णवाहिका मुंबईकडे निघाली, मात्र महामार्गावर तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकली.वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने या चिमुरड्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून,असच जर घडत राहिल तर ग्रामस्थांना १०० टक्के वाहतूक कोंडीचा सामना हा मृत्यूशीच करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.