भारतीय हवामान विभागाने नवरात्रीदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजांसह गडगडाटी सरी पडण्याचा अंदाज आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली असून, ब्रह्मपुरी येथे गुरुवारी सर्वाधिक ३५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त आहे.
या भागात नवरात्रोत्सवात पावसाचा इशारा : -
नाशिक , अहिल्यानगर, सोलापूर, बीड, नांदेड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, नागपूर, वर्धा, दक्षिण भारत आणि गुजरात या भागात नवरात्र उत्सवात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.