राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे पाण्याचे पूजन करण्यासाठी गेले होते. जनाई योजनेचे पाणी बंद पाईपलांद्वारे बोरकरवाडी तलाव येथे सोडण्यात आले आहे. त्या पाण्याचे पूजन अजित पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या काळात विकास करण्याचा प्रयत्न केला. पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही. तसेच ते पुढे म्हणाले, मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं होतं त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितले आहे. तहसीलदाराला सांगितला आहे, पीआय देखील सांगितले आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावा लागतं त्याशिवाय पुढे चालता येत नाही अजित पवारांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.