World Cup Final 2023 Prediction on Rain Saam Tv
Sports

World Cup Final Prediction : फायनलमध्ये पावसानं खोडा घातल्यास कोण ठरणार चॅम्पियन? काय आहे नियम?

World Cup Final : टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवत १० सामन्यांमध्ये विजय मिळवलाय.

Bharat Jadhav

World Cup Final Prediction:

देशात चालू असलेल्या वर्ल्डकपच्या महासंग्राम अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान होणार आहे. या अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला तर काय होईल याची चिंता अनेकांना लागलीय. पाऊस आला तर सामन्याचा निकाल कोणाकडून लागेल? कोणता संघ वर्ल्डकपचा हक्कदार होणार? सामन्यातील षटके कमी केली जातील का, असे असंख्य प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येत आहेत. (Latest News)

टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम ठेवत १० सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलियन संघाला सलग दोन पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या सर्व सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. दरम्यान २० वर्षांनंतर दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही संघ २००३ मध्ये एकमेकांमसमोर आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.यावेळी जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन संघ भारताशी भिडणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाऊस आला तर कोण ठरेल विजेता

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान या सामन्यादरम्यान पाऊस येणार, अशी शंका अनेकांनी वर्तवलीय. परंतु वर्ल्डकपच्या फायनलमध्ये वरुणराजा बॅटिग करणार नाही. हवामान खात्यानुसार, सामन्यादरम्यान आकाश पूर्णपणे निरभ्र असणार आहे. कमाल तापमान ३४ अंश आणि किमान २० अंश राहणार आहे. यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही.

पण जरी पाऊस आला तर सामन्याचं काही होईल असा प्रश्न अनेकांना पडलाय. अंतिम सामन्यात पाऊस आला तर आयसीसीने वर्ल्डकप अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलाय. पहिल्या दिवशी पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही तर तो दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो. यामुळे अंतिम सामन्यात षटके कमी होणार नाहीत. तर पहिल्या दिवशी सामना जेथे थांबला होता, त्याच षटकापासून दुसऱ्या दिवशी सामना पुन्हा सुरू केला जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे खराब झाला, तर साखळी टप्प्यात गुणतालिकेत ज्या संघाला चांगले स्थान असेल त्या संघाला विजेता घोषित केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT