rahul dravid with rohit sharma twitter
क्रीडा

Rahul Dravid Head Coach: राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज का केला नाही? समोर आलं मोठं कारण

Ankush Dhavre

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी रवी शास्त्रींनंतर २०२१ मध्ये ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपर्यंत होता. मात्र त्यांना टी -२० वर्ल्डकप २०२४ पर्यंत थांबवण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने १७ वर्षांनंतर टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज करण्यासाठी नकार का दिला? यामागचं एक मोठं कारण समोर आलं आहे. (Rahul Dravid News )

बीसीसीआयच्या नियमानुसार, ज्या कोणाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनायचं असेल त्याला अर्ज दाखल करणं अतिशय महत्वाचं आहे. राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र त्यांना ही अर्ज दाखल करणं बंधनकारक होतं. त्यांनी या पदासाठी पुन्हा एकदा अर्ज केलाच नाही. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

जय शहांनी सांगितलं कारण

राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपद का सोडलं? याचं कारण आता समोर आलं आहे. जय शहा म्हणाले की, त्यांनी मला सांगितलं होतं की, 'कौटुंबिक कारणास्तव ते पुन्हा या पदासाठी अर्ज दाखल करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हे पदा सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर केला आणि त्यांना फोर्सही केलं नाही. '

राहुल द्रविड यांचा यशस्वी कार्यकाळ

राहुल द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील जमेची बाजू म्हणजे, या काळात खेळाडूंमध्ये वाद आणि फूट पडण्याच्या घटना घडल्या नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय खेळाडूंमध्ये शिस्त पाहायला मिळाली. यासह भारताने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेची सेमिफायनल गाठली. यासह २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि आता टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Jammu Kashmir Exit Polls : जम्मू-काश्मीरमध्ये येणार 'इंडिया आघाडी'चं सरकार, भाजपला बसणार धक्का? जाणून घ्या EXIT POLL चा अंदाज

SCROLL FOR NEXT