IND vs ENG Saam Tv
Sports

IND vs ENG: चौकार ठोकून कोहलीने रचला रेकॅार्ड; असे करणारा तिसरा खेळाडू

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे.

वृत्तसंस्था

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावात चौकार ठोकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 23,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

त्याने आपल्या डावाच्या 13 व्या चेंडूवर शानदार चौकार मारला. त्याने जेम्स अँडरसनच्या चेंडूवर चौकार मारून आपले खाते उघडले तसेच आपल्या 23,000 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 440 व्या सामन्यात हे यश मिळवले.

कोहलीने 23,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या

विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या 440 व्या सामन्यात 23,000 धावा पूर्ण केल्या आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 664 सामन्यांमध्ये 34,357 धावा केल्या, तर राहुल द्रविड दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने 504 सामन्यांमध्ये 24,064 धावा केल्या आहेत. विराट कोहली सचिन आणि द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT