Virat Kohli Century Saam TV
Sports

Virat Kohli Century : विराटच्या विक्रमी शतकात अंपायरचा वाटा?, त्या निर्णयाची जोरदार चर्चा; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

World Cup 2023, IND vs BAN : विराटचं शतक होईल की नाही, अशी परिस्थिती सामन्यात निर्माण झाली होती.

प्रविण वाकचौरे

World Cup 2023 :

वर्ल्डकप २०२३मध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत विजयाचा चौकार लगावला आहे. सलग चार सामने जिंकत भारताने पॉईंट टेबलमध्ये आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. मात्र टीम इंडियाच्या कालच्या विजयापेक्षा विराट कोहलीच्या शतकाची जोरदार चर्चा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने विनिंग शॉटवर शतक साजरं केलं. मात्र विराटचं शतक होईल की नाही, अशी परिस्थिती सामन्यात निर्माण झाली होती. कारण टीम इंडियाला जिंकण्यासाठी कमी आणि विराटच्या शतकसाठी जास्त धावांचा गरज होती. अशावेळी अंम्पायर रिचर्ड केटलबरो यांनी सर्वात मोठी भूमिका बजावल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे. (Latest sports updates)

सामन्याच्या शेवटच्या क्षणी टीम इंडियाला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज असताना विराट कोहली त्याच्या शतकापासून तीन धावा दूर होता. येथे नसूम अहमदने चेंडू लेग साईडवर फेकला. मात्र अम्पायरने हा चेंडू वाईड दिला नाही.

यावरुन वाईड न दिल्याच्या अंम्पायरच्या निर्णयावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आयसीसीच्या नियमांवरही नजर टाकली, तर विराटच्या शतकाचा आणि पंचांच्या या निर्णयाचा काहीही संबंध नसल्याचे कळून येईल.

वाइड बॉलचे नियम

मागील वर्षी जारी करण्यात आलेल्या आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, फलंदाज उभा असलेल्या ठिकाणाहून चेंडू गेला आणि फलंदाजाने ती जागा सोडली, तर त्या चेंडूला वाईड द्यायचं की नाही याचा निर्णय पूर्णत: अंपायरवर अवलंबून आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट फलंदाजी करत असतानाही नेमकं तेच झालं.

विराट लेग स्टंपच्या बाहेर उभा होता. पण चेंडू जवळ येत तो ऑफ स्टंपच्या दिशेने गेला, त्यामुळे चेंडू लेग साइडमधून कीपरच्या हातात गेला. विराटने आपली जागा सोडली नसती तर चेंडू त्याच्या पॅडला लागला असता. अशा अंम्पायरवर अवलंबून आहे की वाईड द्यायचं की नाही.

विराटचं शतक झालंच असतं

मात्र अम्पायरने तो वाईड दिला असता तरी विराटने आपले शतक पूर्ण केले असते. कारण वाईड मिळाल्यानंतरही भारताला विजयासाठी एक धाव हवी होती आणि विराटने अखेरच्या सामन्यात षटकार मारला होता. म्हणजेच विराटच्या या शतकात अम्पायरने दिलेल्या वाईड बॉलच्या निर्णयाची काहीही भूमिका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT