Asia Cup Final saam tv
Sports

Tilak Varma: अविस्मरणीय! पाकिस्तानला चारीमुंड्या चीत कसं केलं? प्रेशरमध्ये मास्टरक्लास खेळण्याचं गुपित तिलकनं उलगडलं, २ जणांना दिलं श्रेय

Asia Cup Final: आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध तिलक वर्माने (Tilak Varma) साकारलेली ६९ धावांची अविस्मरणीय आणि विजयी खेळी केवळ विक्रमांमुळे नव्हे, तर त्याने दाखवलेल्या असामान्य संयम आणि दबाव हाताळण्याच्या क्षमतेमुळे लक्षात राहील.

Surabhi Jayashree Jagdish

एशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला ५ विकेट्सने नमवत ट्रॉफीवर ९ व्यांदा नाव कोरलं आहे. यावेळी भारतीय टीमचा फलंदाज तिलक वर्माला विजयाचा हिरो मानलं जातंय. पाकिस्तानविरुद्ध एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात खेळलेली नाबाद 69 रन्सची झुंजार खेळी आपल्या कारकिर्दीतील “सर्वात खास खेळींपैकी एक” असल्याचं त्याने म्हटलंय.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तिलकने 53 बॉल्समघ्ये 69 रन्सची खेळी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने 147 रन्सचं लक्ष्य दोन बॉल शिल्लक असताना गाठलं.

तिलकची कारकिर्दीतील खास खेळी

सामन्यानंतर झालेल्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार स्विकारताना तिलक म्हणाला, “या सामन्यात खूप दडपण होतं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. मी शांतपणे, संयम ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात खास खेळींपैकी एक आहे. चक दे इंडिया!”

कुठल्याही क्रमावर फलंदाजीची तयारी

तिलक पुढे म्हणाला, “आम्ही टीमसाठी कुठल्याही क्रमावर खेळायला तयार असतो. मला माझ्या खेळावर पूर्ण विश्वास आहे. विकेट स्लो असेल तेव्हा काय करायचं याबद्दल मी गौतम सरांशी चर्चा केली आहे आणि त्यावर भरपूर सरावही केला आहे.”

टीमच्या इतर सहकाऱ्यांचंही केलं कौतुक

विकेटकीपर संजू सॅमसन आणि ऑलराऊंडर शिवम दुबे यांच्या भागीदारीचं त्याने विशेष कौतुक केलं. “संजूची खेळी अप्रतिम होती. तर शिवमने दडपणाच्या क्षणी ज्या शांततेने फलंदाजी केली, ती टीमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली,” असं तिलक म्हणाला. तिलक आणि संजूने चौथ्या विकेटसाठी 57 रन्सची भागीदारी केली. तर शिवमसोबत पाचव्या विकेटसाठी 60 रन्सची भागीदारी केली.

अभिषेक शर्माला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ अवॉर्ड

टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडू (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) म्हणून अभिषेक शर्माची निवड झाली. तो म्हणाला, “वर्ल्डकप जिंकणाऱ्या या टीममध्ये सलामी फलंदाज म्हणून स्थान मिळवणं सोपं नव्हतं. मी माझ्या खेळावर खूप मेहनत घेतली. कोच आणि कर्णधाराने सुरुवातीपासून मला पाठबळ दिलं. जेव्हा मी चांगलं खेळतो तेव्हा संघाने जिंकणं महत्त्वाचं असतं. काही वेळा अपयश येतं, पण प्रक्रियेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Paratha: दररोज आलू पराठा खाल्ल्यास काय होईल?

PM Modi : नेहरूंनी 'वंदे मातरम्'लाच विरोध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आक्रमक भाषण, इंदिरा गांधींवर साधला निशाणा

Maharashtra Live News Update: विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियमपासून सर्व मोर्चे निघणार

Gautam Gambhir: कोचला टार्गेट करू नका, त्याची नोकरीही...! गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

RBI Rule: तुमचं झिरो बॅलन्स अकाउंट आहे? RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय; हे ४ नियम लवकरच बदलणार

SCROLL FOR NEXT