काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गेला. गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाले. काल (७ मे) भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारताच्या तिन्ही सेनांनी काल ७ मे रोजी पहाटे १.४४ च्या सुमारास संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण ९ दहशतवादी अड्डे भारताने नष्ट केले. एअर स्ट्राइकदरम्यानचे आणि त्यानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये भारताकडून एअर स्ट्राइक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती झाली हे दिसते.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील नऊ ठिकाणांपैकी चार ठिकाणे ही पाकिस्तानमध्ये, तर पाच ठिकाणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होती. फक्त २५ मिनिटांमध्ये कारवाई पूर्ण करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ८० पेक्षा अधिक दहशतवादी हवाई हल्ल्यात मारले गेल्याचे म्हटले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याने देखील तात्काळ उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारामध्ये १० पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली. याशिवाय भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा युरोप दौरा रद्द केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.