
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भारताच्या तिन्ही सेना दलांनी एकत्रितपणे ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. ७ मे रोजी पहाटे १.४४ वाजता भारताने एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या पाकिस्तानी स्थानिक नागरिकाने ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली. या नागरिकाचा व्हिडीओ एएनआयने प्रसिद्ध केला आहे.
'रात्रीचे १२.४५ वाजले होते. आम्ही सर्वजण झोपलो होतो. अचानक एक ड्रोन आला, त्याच्या पाठोपाठ आणखी तीन ड्रोन आले आणि ड्रोन्सनी मशिदींवर हल्ला केला.. आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले', असे या पाकिस्तानी स्थानिक नागरिकाने माध्यमांना सांगितले. हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर त्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
भारताच्या तिन्हीही सैन्यदलांनी संयुक्तपणे ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील ९ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम), लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले अशी माहिती समोर आली आहे.
एअर स्ट्राईक झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार ठिकाणे पाकिस्तानच्या आत होती. तर उर्वरित पाच ठिकाणे पाकव्याप्त काश्मीर येथे होती. भारताने फक्त २५ मिनिटांमध्ये एअर स्ट्राईक करुन पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांना धडा शिकवला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागावर पाकिस्तानने गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.