virat-kohli-with-rohit-sharma saam tv news
क्रीडा

Virat Kohli- Rohit Sharma: टी-२० वर्ल्डकपसाठी विराट-रोहितला संघात स्थान मिळणार का? दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगितलं

Ankush Dhavre

Brian Lara On Virat Kohli And Rohit Sharma:

नुकताच वर्ल्डकप २०२३ स्पर्धा संपली असून, भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सुरुवातीचे १० सामने जिंकले मात्र फायनलचा सामना गमावल्याने तिसऱ्यांदा वनडे वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची संधी हुकली.

आता भारतीय संघाचं संपुर्ण लक्ष २०२४ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर असणार आहे. दरम्यान या स्पर्धेत रोहित आणि विराट खेळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहेत. मात्र गेल्या काही टी-२० मालिका पाहिल्या, तर संघात युवा खेळाडूंना स्थान दिलं जात आहे. यासह वरिष्ठ खेळाडूंना दुर्लक्ष केलं जात आहे.

ज्यात विराट आणि रोहित सारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र तो आता दुखापतीमुळे बाहेर असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्याबाबत बोलताना वेस्टइंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा म्हणाले की,'मला असं वाटतं की, भारत जो संघ निवडेल तो मजबूतच असेल. मात्र तुम्ही अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. विराट आणि रोहित हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना वेस्टइंडिजमधील परिस्थितीचा चांगलाच अंदाज आहे. त्यांना तिथे खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, 'मी हे म्हणत नाही की, त्यांनी आपल्या भविष्याबाबत निर्णय घ्यावा.मात्र मला असं वाटतं की, ते ज्या दर्जाचे खेळाडू आहेत, ते पाहता त्यांना भारतीय क्रिकेटसाठी काय आणि किती करायचं आहे हे जाणून घेणं सन्मान असेल.'

विराट आणि रोहितला संधी का दिली जात नाही?

विराट आणि रोहितला वाढत्या वयामुळे संधी दिली जात नाहीये. विराट आणि रोहितचं वय ३५ च्या पुढे आहे. त्यामुळे संघात युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. मुख्य बाब म्हणजे नुकताच संपन्न झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हे दोघेही टॉप २ मध्ये होते.

विराट कोहलीने ७६५ धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने ५९७ धावा केल्या होत्या.या दोन्ही फलंदाजांनी आयपीएल स्पर्धेतही दमदार खेळ केला आहे. त्यामुळे या दोघांना संघाबाहेर ठेवण्याचं रिस्क टीम मॅनेजमेंट घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT