Yashasvi Jaiswal News: टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरताच यशस्वीने 'या' खेळाडूची मागितली माफी! काय आहे कारण?

Yashasvi Jaiswal Apologies Ruturaj Gaikwad: या सामन्यात यशस्वी जयस्वाल सामनावीर ठरला. दरम्यान सामना झाल्यानंतर त्याने माफी मागितली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या .
yashasvi-jaiswal
yashasvi-jaiswaltwitter

Yashasvi Jaiswal On Ruturaj Gaikwad Runout:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्याच्या मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२६ नोव्हेंबर) तिरुवनंतपुरमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) माफी मागितली आहे.

ऋतुराज गायकवाडची मागितली माफी..

या सामन्याचा सामनावीर ठरताच, यशस्वी जयस्वालने आपली चूक मान्य करत ऋतुराज गायकवाडची माफी मागितली. तर झाले असे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यात यशस्वी जयस्वालने शॉट मारला आणि २ धाव घेण्याचा प्रयत्न केला. पहिली धाव दोघांनी वेगात पूर्ण केली. त्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी यशस्वीने धावण्याचा इशारा केला. ऋतुराज अर्ध्या क्रीझपर्यंत पोहोचताच यशस्वीने त्याला मागे जाण्याचा इशारा केला. ऋतुराज मागे जाणार इतक्यात यष्टीरक्षक वेडने त्याला धावबाद केलं. (Latest sports updates)

yashasvi-jaiswal
IND vs AUS: भारताच्या गोलंदाजीपुढे कांगारुंच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, टीम इंडियाची मालिकेत विजयाची दुर्री

या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर तो म्हणाला की, ' मी अजून शिकतोय. गेल्या सामन्यात जे झालं ती माझी चूक होती आणि मी ऋतुराजची माफी मागितली होती. मी माझी चुकी मान्य केली. ऋतू दादा चांगला माणूस आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. मी माझ्या शॉट्समध्ये सुधारणा करतोय. मी माझी मानसिक स्थितीतही सुधारणा करतोय.'

yashasvi-jaiswal
IND vs AUS 2nd T20I : लक्ष्य मोठं डोंगराएवढं! इशान-'ऋतु'राज यशस्वी बरसला, रिंकूचा कडकडाट; ऑस्ट्रेलियाला २३६ धावांचं टार्गेट

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या दिशेनं लागला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने ५३, ऋतुराज गायकवाडने ५८ आणि इशान किशनने ५२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावांचा डोंगर उभारला. तर या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला १९१ धावा करता आल्या. भारतीय संघाने या सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com