naukri-job-news

Indian Railway Bharti: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, भारतीय रेल्वेत तब्बल २४३८ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. तब्बल २४०० हून अधिक जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. दक्षिण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. २०२४-२५ या वर्षामध्ये विविध ट्रेडमध्ये २४०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत दक्षिण रेल्वेने १८ जुलै रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट आहे.

दक्षिण रेल्वेत शिकाऊ पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्हाला या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज पोर्टला भेट द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी करुन अर्ज दाखल करावा लागेल.

शिकाऊ पदांसाठी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५० गुणांसह १० वी आणि १२वी उत्तीर्ण झालेले असावे. तर XITI च्या बाबतीत, १० वी नंतर ITI किंवा NCVT पास उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी १५ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या वयोमर्यादेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ ते ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या नोकरीसाठी तामिळनाडू, केरळ, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील रहिवासी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT