भारताने काल मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक केले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उडवले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला आता भारता घेतला आहे. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव दिले आहे. हे नाव देण्यामागचे कारण आता समोर आले आहे.
ऑपरेशन सिंदूर नाव का निवडलं? (Why India Choose Operation Sindoor Name)
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्याला ऑपरेशन सिंदूर नाव दिले. सिंदूर हे नाव निवडण्यामागचे कारण आता समोर आले आहे. सिंदूर म्हणजे विवाहित स्त्रियांचे प्रतिक आहे. तसेच सिंदूर हे यौद्ध्यांसाठी गौरवाचे प्रतिक आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर या नावाने ही कारवाई केली आहे.
पहलगाममधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी हिंदू पुरुषांना मारले होते. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारले होते. त्यांनी गोळ्या झाडून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवालदेखील शहीद झाले. लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांतच विनय यांचे निधन झाले. या घटनेनंतर हिमांशीचे सौभाग्य तिच्याकडून हिरावून घेतले. यामुळे संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. त्यामुळे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव निवडले.
पहलगाममधील अनेक हिंदू महिलांच्या पतींना गोळ्या झाडून मारण्यात आले. विवाहित महिलांना आपला पती गमवावा लागला. त्यांच्या पतीच्या अस्तित्वाचे आणि संरक्षणाचे प्रतिक म्हणजे सिंदूर आहे. त्यामुळेच या ऑपरेशनला हे नाव देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.