Dhanshri Shintre
हिंदू परंपरेनुसार विवाहानंतर महिलांच्या मस्तकावर सिंदूर लावणे ही शुभ आणि पतीच्या दीर्घायुष्याची निशाणी मानली जाते.
धार्मिक परंपरेनुसार, सिंदूर लावणे हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते आणि त्यांच्यावरील सन्मानाचे प्रतीक मानले जाते.
पण तुम्हाला माहिती आहे का, सूर्यास्तानंतर सिंदूर लावणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या त्यामागचं धार्मिक कारण.
संध्याकाळनंतर मुळामध्ये सिंदूर लावणे टाळावे, कारण धार्मिक मान्यतेनुसार ते अशुभ मानले जाते.
सूर्यदेव ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात, तसेच दिवसाचा काळ नियंत्रित करणारा प्रमुख देव म्हणून पूजला जातो.
सिंदूर लावण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त हा काळ शुभ मानला जातो, असे धार्मिक परंपरेनुसार मानले जाते.
संध्याकाळनंतरची वेळ चंद्रदेवाच्या अधीन मानली जाते आणि त्यालाच रात्रीच्या वेळेचे प्रतिनिधीत्व दिले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर सिंदूर लावणे टाळावे, कारण ही वेळ शुभ मानली जात नाही असे काही मत आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.