Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives Saam
देश विदेश

चारचाकीचं नियंत्रण सुटलं, एक्स्प्रेस वेवरून कार थेट खड्ड्यात कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू | VIDEO व्हायरल

Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives: मध्यप्रदेशातील रतलाम येथे दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला. भरधाव कार थेट खड्ड्यात कोसळली. ५ जणांचा जागीच मृत्यू.

Bhagyashree Kamble

मध्य प्रदेशातील रतलाम येथून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी एक्स्प्रेसवेवरून घसरून थेट खड्ड्यात पडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात एक १५ वर्षांचा मुलगा आणि ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एक्स्प्रेस वेवर हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. तसेच खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना ८ वाजेच्या सुमारास भीमपूरा गावात घडली. ही कार दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं जात होती.

एक्स्प्रेस वेवर भरधाव कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. तसेच कार खड्ड्यात जाऊन पडली. उंचावरून कार खड्ड्यात पडल्यामुळे कारचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले.

स्टेशन हाऊस ऑफिसर सुरेंद्र सिंह गदरिया यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. अपघात नेमका घडला कसा? याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात कारचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT