Supreme Court News Saamtv
देश विदेश

Supreme Court: 'राज्यपालांना आत्मपरीक्षणाची गरज, तुम्ही जनतेतून निवडलेले लोकप्रतिनिधी नाही..' सुप्रीम कोर्टाने फटकारले

Supreme Court News: राज्य सरकारे न्यायालयात आल्यावरच राज्यपाल विधेयकांवर निर्णय का घेतात? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

Gangappa Pujari

Supreme Court Slams Panjab Governer:

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या स्पष्ट, बेधडक आणि कडक निर्णयांसाठी ओळखले जातात. अनेक महत्वांच्या याचिकांवर त्यांनी दिलेले निर्णय हे लक्षवेधी ठरत असतात. पंजाब सरकारमधील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिशांनी महत्वाचे निरिक्षण नोंदवले असून देशातील राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंजाब सरकारने (Panjab Government) राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी काही महत्त्वाची विधेयके विनाकारण अडवून ठेवली आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने इतर राज्यांमध्येही अशीच स्थिती असल्याचे सांगत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

"राज्यपालांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाहीत याची जाणीव राज्यपालांनी ठेवावी. राज्य सरकारे न्यायालयात आल्यावरच राज्यपाल विधेयकांवर निर्णय का घेतात? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावरच राज्यपाल काम करतात, हे थांबायला हवे, प्रकरण न्यायालयात येण्यापूर्वीच राज्यपालांनी कारवाई करावी.." असे न्यायालयाने म्हणले आहे.

तसेच राज्यपाल एकतर विधेयकांना मंजुरी देण्यास नकार देऊ शकतात, ती राष्ट्रपतींकडे शिफारसीसाठी पाठवू शकतात किंवा मग त्यांना ती एकदा परत विधिमंडळाकडे परत पाठवण्याचा अधिकार आहे. असेही न्यायालयाने म्हणले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात टेम्पो ट्रँव्हलर बसचा अपघात

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT