CJI On Constitution Saam Digital
देश विदेश

CJI On Constitution: ''जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान''; संविधान दिनानिमित्त CJI डीवाय चंद्रचूड यांनी व्यक्त केला विश्वास

CJI On Constitution: प्रत्येक नागरिकासाठी न्यायपालिकेचे दरवाजे सदैव खुले आहेत. कोणीही न्यायालयात येताना घाबरू नये. जनतेचा न्यायपालिकेवर असलेला विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

CJI On Constitution

प्रत्येक नागरिकासाठी न्यायपालिकेचे दरवाजे सदैव खुले आहेत. कोणीही न्यायालयात येताना घाबरू नये. जनतेचा न्यायपालिकेवर असलेला विश्वास हेच आमचे श्रद्धास्थान आहे. न्यायालयात येणारे प्रत्येक प्रकरण संविधानानुसार चाललेल्या राज्याचे उदाहरण आहे. राज्यघटनेने इतर प्रकरणांसोबत राजकीय वाद सोडवण्याचा अधिकारही दिला आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या संविधानाचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले. ते संविधान दिनाच्या समारंभात बोलत होते.

शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्याच्या आशेने लोक सर्वोच्च न्यायालयात येतात. पोस्टकार्डच्या जमान्यातही सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून न्याय देण्याची विनंती करून समाधान मानत असतात, इतका विश्वास लोकांचा न्यायपालिकेवर आहे. मीडिया रिपोर्ट्स याचे साक्षिदार आहेत. तसेच मागच्या वर्षी राष्ट्रपतींनी कारागृरांमधील गर्दीवर चिंता व्यक्त केली होती. यावरही काम झाले आहे. कारागृह आणि ट्रायल कोर्टात आदेश पोहोचवण्याची व्यवस्थेला अधिक गती देण्यात आली आहे. शिवाय जुन्या कारागृहांचे नियम दुरुस्त करण्यासाठी पडताळणी केली जात आहे, असे ते म्हणाले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या स्थापनेवर मत मांडताना डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा न्यायालयापर्यंत पोहोचण्याचा अधिकार हा घनात्मक अधिकार असून स्वातंत्र्याचा गाभा आहे. राज्यघटना ज्याप्रमाणे राजकीय मतभेद सोडवण्याची परवानगी देते, त्याचप्रमाणे न्यायालय आम्हाला वादविवाद सोडवण्याची परवानगी देते. तसेच आपण प्रजासत्ताक आणि संविधान दिन का साजरा करतो यांचे उत्तर वसाहतवाद ते स्वातंत्र्याच्या इतिहासात आहे. जिथे स्वातंत्र्याचे निर्णय केवळ जनकल्याणासाठी घेतले गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, भारताच्या संविधानाचे आणि स्वातंत्र्याचे काय पुढे काय होईल. ते म्हणाले की भारताने केवळ घटनात्मक लोकशाही राखली नाही तर ती जनतेने आत्मसातही केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT