नेपाळमध्ये जेन-जी आंदोलनामुळे अराजकता व अस्थिरता वाढली.
भारत-नेपाळ व्यापार व दैनंदिन गरजांवर याचा परिणाम होऊ शकतो.
सीमावर्ती सुरक्षेवर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.
भारत-नेपाळ संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता.
नेपाळमध्ये चालू असलेल्या जेन-जी आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण देशात अस्थिरता आणि अराजकता वाढवलीय. नेपाळमधील या हिंसक आंदोलनाचा भारतावर काय परिणाम होणार आहे. दोन्ही देशाचे संबंध सर्वात चांगले असल्याचं म्हटलं जात आहे, त्याचमुळे नेपाळ देशात आंदोलन पेटल्यानं भारतावरही याचा काय परिणाम होणार होणार आहे. नेपाळ आपल्या दैनंदिन गरजांसाठी भारतावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसह सुरक्षेला धोका निर्माण होणार का असा प्रश्न केला जात आहे.
भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये तणावपूर्व स्थिती निर्माण झालीय. सोशल मीडिआ बंद केल्यानंतर येथील सत्तापालट झाले आहे. येथील सरकारने ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर येथील आंदोलनाची धार वाढली. जगभरात या आंदोलनाची चर्चा होऊ लागलीय. पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडाल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. दरम्यान आता देशाच्या स्थितीवर लष्कराने नियंत्रण मिळवलंय. पण या आंदोलनाचा भारतावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेऊ.
भारत आणि नेपाळ दरम्यान व्यापार संबंध खूप मजबूत आहेत. नेपाल भारताकडून तेल, वीज, औषधे आणि इतर सेवा घेतो. नेपाळमधील अनेक प्रोजेक्ट भारताचे आहेत. येथील रोजगारही त्यामुळे वाढलाय. नेपाळ भारताचा सर्वात मोठा व्यापारातील भागीदार आहे. पण आंदोलनामुळे दोन्ही देशातील आयात-निर्यात ठप्प होऊ शकतो.
हिंसक आंदोलनामुळे देशातील मोठं-मोठे प्रकल्प रखडत असतात. नेपाळमध्ये अनेक हायड्रोपावर प्रोजेक्ट्स सुरू आहेत. ट्रान्समिशन लाइनिंगचे काम होत आहे. त्यामुळे देशातील तणावामुळे ही प्रोजेक्ट रखडत असतात. जर कोणतेही प्रकल्प सुरू होणार असतील तर ते राजकीय अस्थिरतेमुळे थांबू शकतात किंवा त्यांना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो.
आंदोलनामुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. नेपाळमधील पर्यटनावर आंदोलनाचा मोठा परिणाम होणार आहे. भारतातील लोक येथील हॉटेल बुकिंग करत असतात. ट्रॅव्हल कंपन्या आणि एअरलाइन इंडस्ट्रीला मठा फटका बसू शकतो.
भारत-नेपाळमधील सीमा साधारण १,७५० किलोमीटर अंतर आणि बुहतेक सीमा खुली आहे. हिंसा आणि अस्थिरतेमुळे हत्यार, तस्करी, स्मगलिंग सारख्या कारवाया वाढत असतात. यामुळे भारताच्या सीमेवर गस्ती वाढवावी लागेल.
शेजारील देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका भारताचे व्यापारीक भागीदार आहेत. वाढत्या अस्थिरतेमुळे व्यापार मंदावत असतो. भारतासाठी हीदेखील चिंतेची बाब आहे, कारण सध्या भारताला अमेरिकेच्या ५०% शुल्काचा फटका बसतोय. यामुळे व्यापाऱ्यांना आधीच मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आता नेपाळमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे तेथील निर्यातदारांनाही नुकसान, वस्तूंच्या वितरणात विलंब होऊ शकतो.
भारताच्या शेजारीअनेक देश आहेत. तेथे एक हिंसाचार आणि अस्थिरता होणं ही पहिली वेळ नाहीये. गेल्या काही वर्षांत बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्येही अशा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बांगलादेश ते भारतापर्यंतच्या वस्त्र आणि कापड पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्याच वेळी, श्रीलंकेतील अस्थिरतेनंतर तेल, पायाभूत सुविधा आणि बँकिंग सुविधा संकटात आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.