Meerut fire Death Toll Update : उत्तर प्रदेशामधील मेरठमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरातील कर्ता पुरुष नमाजासाठी घरातून बाहेर गेला. त्याचवेळी काळाने घाला घातला अन् घराला भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मृतामध्ये जुडवा मुलींसह ५ चिमुकल्यांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नमाज पडून घरी परतलेल्या पित्याला समोर आपल्या कुटुंबाची झालेला शेवट पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने घटनास्थळावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे संपूर्ण मेरठ शहरात शोककळा पसरली
सोमवारी रात्री मेरठ जिल्ह्यातील एका निवासी घरात लागलेल्या आगीत पाच मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. जेव्हा आग आटोक्यात आली, पण घरात अडकलेले सहा जण गंभीर भाजले गेले होते. त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी ६ जणांचा मृत्यू झाला.
सोमवारी संध्याकाळी घरातील कर्ता व्यक्ती इकबाल हा भावासोबत नमाजासाठी घराबाहेर गेला होता. त्याचवेळी दुमजली इमारतीला भयंकर आग लागली. घरात २ महिला आणि ५ मुले होते. आगीचा भडका इतका वाढला की कुणालाच घराबाहेर पडता आळे नाही. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीचा तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम होते. वरच्या मजल्यावर कुटुंब राहत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल. कपड्यांमुळे आग झपाट्याने वाढली. यामध्ये कुटुंबातील सहा जण जिवंत जळाले.
प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून अद्याप अधिकृत कारणाची पुष्टी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला. स्थानिकांनी सांगितले की, सायंकाळच्या वेळी घरातून आग आणि धुराचे लोळ आलेले दिसले. त्यानंतर पोलिासांना पाचारण करण्यात आले. पण तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीवर नियंत्रण मिळवण्याआधी अग्निशमन दलाला तेथील अरूंद गल्ल्यातून घटनास्थळाकडे जाण्यासाठी कसरत करावी लागली. अग्निशमन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा होता. तिथल्या गल्ल्या अत्यंत अरुंद असल्याने गाड्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागले. त्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला. लवकर आगीवर नियंत्रण मिळवता आले असते तर ६ जणांचा जीव वाचला असता. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक पाहणीनंतर शॉर्ट सर्किट किंवा गॅस सिलेंडरची गळती यापैकी एका कारण असू शकते, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.