30 terrorists killed in defensive operations in Manipur Saam TV
देश विदेश

Manipur Violence: मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

मणिपूरमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बिरेन सिंह यांचा दावा

Satish Kengar

30 Terrorists Killed in Defensive Operations in Manipur: मणिपूरमध्ये अनेक भागात सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सोमवारी येथे दौरा आहे. त्याआधी लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

हिंसाचाराच्या घटनांदरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दावा केला की, राज्यातील विविध भागात सुमारे 30 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे. ते म्हणाले की, दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. एम-16 आणि एके-47 असॉल्ट रायफल आणि स्निपर गन वापरल्या जात आहेत. कारवाई सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 31 मे पर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एन. बिरेन यांनी म्हटले आहे की, नागरिकांच्या विरोधात शस्त्रे वापरणाऱ्या दहशतवादी गटांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी विविध भागात सुमारे 30 दहशतवादी मारले गेले आहेत. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, हिंसाचार पसरवणाऱ्यांवर सुरक्षा दल सातत्याने कारवाई करत आहेत. अनेकांना सुरक्षा दलांनी अटकही केली आहे. ते म्हणाले की, दहशतवादी नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करत आहेत. ही लढाई मणिपूर तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांविरुद्ध आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. परिस्थिती चिघळल्यानंतर इथून मोठ्या संख्येने लोकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेसाठी उमेदवार ठरला; सुनील तटकरेंनी केली नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT