Lok Sabha Speaker Om Birla  ANI
देश विदेश

Om Birla Letter: १३ खासदारांच्या निलंबनाचं मलाही दु:ख पण..; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी खासदारांना लिहिलं पत्र

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी निलंबनच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. खासदारांचे निलंबन आणि १३ डिसेंबरच्या घटनेशी जोडलं जाणं हे दुर्दैवी असल्याचं बिर्ला म्हणालेत.

Bharat Jadhav

Lok Sabha Speaker OM Birla Letter To On Suspend 13 MPs:

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी निलंबनच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. काही राजकीय पक्ष १३ खासदारांच्या निलंबनाचा संबंध १३ डिसेंबरच्या घटनेशी जोडत आहेत, हे दुर्दैवी आणि पूर्णपणे अन्यायकारक असल्याचं बिर्ला म्हणालेत. (Latest News)

खासदारांचे निलंबन (Suspension of MPs) आणि १३ डिसेंबर रोजी सभागृहात घडलेल्या घटनेचा काहीही संबंध नसल्याचं आपल्या पत्रात म्हटलं आहे. खासदारांचे निलंबन हे त्यांच्या वर्तनावरून करण्यात आले आहे. खासदारांचं निलंबन हे हे संसद भवनातील संसदीय परंपरांचे पालन करण्याशी संबंधित आहे. संसदेच्या (Parliamentary) नवीन इमारतीत प्रवेश करताना आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला होता की, आम्ही सभागृहात फलक आणि फलक आणणार नाही, सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन गोंधळ घालणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओम बिर्ला (Om Birla ) यांनी या पत्रात १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या सुरक्षेत झालेली चूक माहिती दिली. सभागृहात झालेल्या घटनेनंतर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. लोकसभेमध्ये (Loksabha) १३ डिसेंबर २०२३ रोजी झालेली घटना ही दुर्दैवी आहे, ही बाब सर्वांसाठी चिंतेची आहे. या घटनेवर सर्वांनी सामूहिकपणे चिंता व्यक्त केली होती. त्याच दिवशी मी सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदेची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कशी करता येईल यावर चर्चा केली होती, असं बिर्लांनी या पत्रात सांगितलं आहे.

खासदारांना उद्देशून पत्रात लिहिताना बिर्ला म्हणाले की, तुम्ही दिलेल्या सुचना ऐकून त्या त्वरीतपणे लागू करण्यात आल्या. सभागृहात घडलेल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमलीय. या समितीने आपलं काम सुरू केलं आहे. या समितीचा अहवाल लवकरच सभागृहात मांडण्यात येणार असल्याचं बिर्ला म्हणालेत.

याव्यतिरिक्त अजून एक हाय पावर्ड समिती नेमण्यात आलीय. जे संसदेच्या परिसरातील सुरक्षेचे विविध पैलूंची व्यापक समीक्षा करेल. ही समिती संसदेची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ठोस कार्य योजना बनवेल. जेणेकरून भविष्यात अशा काही घटना होणार नाहीत.

भूतकाळातील अशा घटनांचा संदर्भ देताना बिर्ला पुढे म्हणाले, “तुम्हा सर्वांना माहीत आहे की अशा घटना आमच्या सभागृहात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. सभागृहात पिस्तूल आणणे, घोषणाबाजी करणे, प्रेक्षक गॅलरीतून उडी मारणे आणि बॅनर फेकणे यासारख्या घटना संपूर्ण देशाने पाहिल्या आहेत. काही सन्माननीय सदस्यांनी सभागृहात मिरचीचा स्प्रे आणल्याच्या घटना देखील देशाने पाहिल्या आहेत. अशा प्रत्येक घटनेच्या वेळी सभागृहाने एकजूट दाखवली आहे. या घटनेच्या विरोधात एका आवाजात विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT