Jaipur News Saam Tv
देश विदेश

Jaipur News : AB+ रक्तगटाऐवजी O+ रक्त चढवल्याने रुग्णानं हॉस्पिटलमध्येच सोडले प्राण

Jaipur : जयपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. जयपूरच्या एका हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jaipur News Of Hospital:

जयपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला आहे. जयपूरच्या एका हॉस्पिटमधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सवाई मानसिंग हॉस्पिटमध्ये एका रुग्णाला दुसऱ्याच ब्लड ग्रुपचे रक्त दिले आहे. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल सरकारने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, बिंदीकुई शहरातील रहिवासी सचिन शर्माचा कोटपुतली शहरात अपघात झाला. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला जयपूरमधील सरकारी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. उपचारादरम्यान चुकीच्या ब्लड ग्रुपचे रक्त दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

याप्रकरणी हॉस्पिटलचे अधीक्षक अचल शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात चुकीच्या रक्त संक्रमणामुळे तरुणाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. परंतु रुग्णाची तब्येत खराब झाली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सचिनचा अपघात खूपच भीषण होता. त्यात खूप जास्त रक्तस्त्राव झाला होता. सचिनला AB+ ब्लड ग्रुपचे रक्त हवे होते. परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून o+ रक्त चढवण्यात आले. त्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे तीळ पिकाचे नुकसान

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT