High Court On Arvind Kejriwal Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal: सुटका केल्यास काम करु शकत नाही... सुप्रीम कोर्टाचे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत महत्वाचे विधान

Arvind Kejriwal News: सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरुन सर्वात महत्वाचे विधान केले. जामिनावर सुटल्यानंतर तुम्ही ऑफिशियल कामं करू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली,|ता. ७ मे २०२४

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीत अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरुन सर्वात महत्वाचे विधान केले. जामिनावर सुटल्यानंतर तुम्ही ऑफिशियल कामं करू शकत नाहीत, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिन अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे. आज न्यायालयाने संपूर्ण सुनावणी ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला असून दुपारी याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी न्यायालयाने केजरीवाल यांची सुटका अन् मुख्यमंत्रीपदाच्या कामकाजाबाबत महत्वाचे विधान केले.

"केजरीवाल हे लोकांनी निवडून दिलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे निवडणुका लक्षात घेता जामिनाचा विचार करत आहोत. निवडणुका नसत्या तर जामिनावरील निकाल राखून ठेवला असता. मात्र आम्ही हे स्पष्ट करतो की जर आम्ही तुम्हाला सोडले तर तुम्ही अधिकृत कर्तव्ये पार पाडू नयेत अशी आमची इच्छा आहे," असे सर्वात मोठे विधान न्यायालयाने यावेळी केले.

त्याचबरोबर आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ईडीलाही परखड सवाल केले. हा १०० कोटींचा घोटाळा आहे तर ११०० कोटी कसे जप्त करण्यात आले. दोन वर्षात आकडा कसा वाढला? असा प्रश्न न्यायमुर्तींनी केला. तसेच कोणत्याही यंत्रणेने दोन वर्ष तपास ताटकळत ठेऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

SCROLL FOR NEXT