Ukraine: 250 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं दुसरं विमान दिल्लीत @YEARS
देश विदेश

Ukraine: 250 भारतीयांना घेऊन युक्रेनमधून एअर इंडियाचं दुसरं विमान दिल्लीत

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने मोहिम राबवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप भारत देशात आणण्याकरिता केंद्र सरकारने (Central Government) मोहिम राबवली आहे. या भागमध्ये, रोमानियाची (Romanian) राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन येणारे दुसरे विमान आज पहाटे दिल्ली (Delhi) विमानतळावर (Delhi Airport) उतरले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी येथील विमानतळावर युक्रेन मधील नागरिकांचे गुलाबाचे फुल देऊन यावेळी स्वागत केले आहे. (2 Air India flight from Ukraine Delhi carrying 250 Indians)

हे देखील पहा-

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष (President) वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चेमध्ये भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या अगोदर बुखारेस्ट येथून २१९ लोकांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये आले होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टमधून २५० भारतीयांना (Indians) घेऊन येणारे दुसरे विमान रविवारी दिल्लीला पोहोचले आहे.

या २ उड्डाणावर आता बुडापेस्टहून तिसरे विमान देखील आज येण्याची शक्यता आहे. युक्रेन मधील भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या लोकांना शेजारी देशांमध्ये हलवताना अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनमध्ये सध्या सुमारे १६ हजार भारतीय अडकले आहेत. दिल्ली विमानतळावर भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सिंधिया यांनी सांगितले आहे की, भारतात प्रत्येक नागरिक घरी परतला आहे. कृपया तुमच्या सर्व मित्रांना आणि सहयोगींना मेसेज पाठवा की आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांच्या सुरक्षित परतीची हमी देणार आहे.

पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात आहेत, सर्वांना सुरक्षितपणे घरी आणण्याकरिता चर्चा सुरू आहे. तुमच्या सुरक्षित भारतात परतल्यावर मी एअर इंडियाचा मनापासून आभारी आहे. भारतीय दूतावासाने नागरिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेन मधील भारतीय दूतावासाने सांगितले आहे की, ते देशाच्या पूर्व भागात बदलत्या घडामोडी आणि परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतीय नागरिकांना युद्धाच्या संकटात संयम बाळगण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेकरिता सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दूतावासाने सांगितले आहे. युक्रेनच्या पूर्व भागात बदलत्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. आमच्या नागरिकांच्या सुरक्षेकरिता आम्ही अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कामध्ये आहोत. युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना आमचा मेसेज आहे की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे या ट्विटमध्ये सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT