Uddhav Thackeray-Kejiriwal
Uddhav Thackeray-Kejiriwal Saam TV
मुंबई/पुणे

Political News: पक्ष, चिन्ह चोरलं तरी उद्धव ठाकरे वाघच, सुप्रीम कोर्टात न्याय मिळण्याची केजरीवालांना आशा; भाजपवर टीकास्त्र

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली आहे. महागाई वाढत आहे. मात्र सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही, खर्च वाढत आहे. केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

देशात एक पक्ष आहे जो २४ तास निवडणुकीबाबत विचार करत असतो. आम्ही लोकांच्या प्रश्चांचा विचार करत असतो. शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालावरही अरविंद केजरीवालांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष चोरला, पक्षचिन्ह चोरले. मात्र उद्धव ठाकरेंचे वडील (दिवंगत बाळासाहेब ठाकरे) वाघ होते आणि ते वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. सुप्रीम कोर्टातून त्यांना न्याय मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो, असं केजरीवाल यांनी म्हटलं.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंना भेटण्याची आज संधी मिळाली. पंजाब आणि महाराष्ट्राचं अनोखं नातं आहे. भगतसिंह पंजाबचे होते तर राजगुरु पुण्याचे होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे.

मात्र आता देशाचे लचके कोण तोडत आहे. अनेक लोक देश लुटून परदेशात पळून जात आहेत. हे कुणामुळे झालं आहे. देशाचं हित कसं साधलं जाईल, लोकांची प्रगती कशी होईल, या मुद्यांवर आमची चर्चा झाली असल्याचं, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT