sanjay raut file photo  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut |रडायचं नाही लढायचं; संजय राऊत यांनी ईडी कोठडीतून लिहिले विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र

राऊत यांनी ई़डीच्या कोठडीतून त्यांना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. राऊत यांनी सदर पत्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले असून ते माध्यमांसमोर आले आहे.

सूरज सावंत

Sanjay Raut Letter : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. तर दुसरीकडे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (Ed) अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राऊत यांनी ई़डीच्या कोठडीतून त्यांना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. राऊत यांनी सदर पत्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले असून ते माध्यमांसमोर आले आहे. राऊतांनी या पत्रातून 'रडायचं नाही लढायचं' या बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली आहे.

संजय राऊत यांनी पत्रातून सर्व विरोधी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची आठवण ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना करून दिली आहे. 'रडायचं नाही लढायचं,जे सत्य आहे त्यासाठी लढा', या बाळासाहेबांच्या विचाराची आठवण राऊत यांनी मित्र पक्षातील नेत्यांना करून दिली आहे.

राऊत यांनी पुढे लिहिले आहे की, 'मी या पत्राच्या माध्यमातून मला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार'.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना हे सदर पत्र संजय राऊत यांनी लिहिले आहे. अडचणीच्या काळात तुम्हाला कळते की, तुमचे खरे सहकारी कोण आहेत. मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. केंद्रीय यंत्रणांनी माझ्यावर राजकीय हेतूनं कारवाई केली, त्यावेळी तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे राऊत कुटुंब आणि हिंतचिंतकाचे देखील आभार मानले आहेत. माझी लढाई यापुढे सुद्धा सुरू राहील. अंतिम श्वासापर्यंत लढत राहिन, दबावापुढे झुकणार नाही, विजय आमचाच होणार आहे आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल, असेही राऊत यांनी पत्रात लिहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT