Rohit Pawar :  Saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar : एकनाथ शिंदे यांना धोक्याची जाणीव झाली; रोहित पवार असे का म्हणाले?

Rohit Pawar on Mahayuti govenment : रोहित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शिंदेंना धोक्याची जाणीवर झाल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : महायुती सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी जाहीर झाला असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यंदा मुख्यमंत्री भाजपचा होणार, ही बाब निश्चित आहे. मात्र, भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याचंही वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.

रोहित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे. 'एकनाथ शिंदे यांना धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते गृहमंत्री पद मागत आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील कोण मंत्री होणार हे ठरवलं पाहिजे. मात्र, भाजपच सर्व ठरवताना दिसत आहे. भाजपला अपेक्षित असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना मंत्रिपद मिळेल. पंकजा मुंडे यांना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्यांचा अनुभव आहे. त्या ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकेल'.

'आमदार रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्ती देण्याची मीच शिफारस केली होती. मीच तो प्रस्ताव मांडला होता. त्याला सर्वांनी संमती दिली. आमच्याकडे आता नेते राहिलेले नाहीत. मुख्य प्रतोद महत्वाचे पद आहेत. आम्ही नवख्या व्यक्तीला दिले. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. मला पक्ष भविष्यात योग्य पद देईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदावर बोलताना रोहित पवार म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगलं काम केलं आहे. आता पक्ष संघटनेत बदल करण्याची वेळ आली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे पक्षात लवकरच बदल करतील. तहसीलदार यांनी परवानगी नाकारली असली तरी उद्या माळशिरसमध्ये मतदान होणारच आहे, असे रोहित पवार म्हणाले.

महायुतीच्या सत्तावाटपावर रोहित पवार म्हणाले, 'भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद जाऊन देणार नाहीत. शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळालं नसल्याने सरकार वाचलं नाही. मला असं वाटतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा आमदारांवर विश्वास होता. त्यांचा शिंदेंवर विश्वास होता'.

खासदार सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस भेटीवरही रोहित पवारांनी भाष्य केलं. 'बाळ्या मामा यांच्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढली असेल, महिला सुरक्षित नसतील. त्यामुळे ते गेले असतील, ते काय सांगतायेत पाहावं लागेल. आमचे आमदार खासदार संपर्क साधत नाहीत. तर भाजप त्यांच्याशी संपर्क साधत आहे, असं रोहित पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT