Navi Mumbai Water Shortage Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Water Shortage: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट; आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात, जाणून घ्या वेळापत्रक

3 Days Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईत आठवड्यातून ३ दिवस पाणीकपात होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवी मंबईकरांना आता पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईत आठवड्यातून आता तीन दिवस पाणी कपात होणार आहे. तीन दिवस पाणी कपात म्हणजे आठवड्यातून ४ दिवस पूर्णवेळ पाणी येणार आहे.

मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावत जात असल्याने महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळा सुरु झाला असला तरीही अजूनपर्यंत आवश्यक तितका पाऊस पडला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नवी मुंबईत तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणा आहे. हे तीन दिवस फक्त सकाळीच पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्यास सांगण्यात येत आहे.

नवी मुंबईत पुढील आठवड्यापासून तीन दिवस पाणी कपात होणार आहे. पाणी कपातीमुळे नागरिकांचे मात्र हाल होणार आहे. मोरबे धरण क्षेत्रात पावसाने दांडी मारली आहे. पाऊस नसल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने आता पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास धरणे भरण्यास मदत होईल. ठाण्यातील तानसा धरणात फक्त 35.33 % टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर मोडकसागर धरणात 38.02 % टक्के पाणीसाठी आहे.भातसा धरणात 23.49 % पाणीसाठी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT