नवी मुंबईत भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली
उमेदवारी नाकारल्याने पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली होती
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांवर भाजपने कारवाई केली
एकूण ११ भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून निलंबन करण्यात आले
नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपने नवी मुंबईत मोठी कारवाई केली. उमेदवारी अर्ज वाटपावरून नाराज झालेल्या अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्व बंडखोरांविरोधात भाजपने मोठी कारवाई केली. नवी मुंबईमधील ११ पदाधिकाऱ्यांना भाजपने निलंबित केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात दिसून आली. उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या बंडखोरानी थेट भाजपच्याच उमेदवाराला काही ठिकाणी आव्हान दिले. त्यामुळे अखेर भाजपने नवी मुंबईतील बंडखोरांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. ११ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नवी मुंबईमध्ये ११ ठिकाणी भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्वांचे निलंबन करण्यात आले आहे. भास्कर यमगर , जयश्री चित्रे, जयेश थोरवे, संपत शेट्टी, सी. व्ही. रेड्डी , मंगल घरत, पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू , दत्ता घंगाळे, अश्विनी घंगाळे आणि अल्फा शर्मा अशा या सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या ११ जणांना भाजपकडून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, अमरावतीमध्ये देखील भाजपने अशीच कारवाई केली होती. अमरावती शहरातील भाजप पक्षातील १५ पदाधिकारी आणि सदस्यांना निलंबित करण्यात आले. पक्षशिस्त भंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कारवाई केली होती. निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांवर अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.