Mumbai Air Pollution
Mumbai Air Pollution  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Pollution : मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ; समोर आली धक्कादायक माहिती

Ruchika Jadhav

Mumbai Pollution : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्याचा हवामानाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण ३१ दिवस दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. मुंबईच्या ठाणे, कल्याण, नवी मुंबई अशा काही शहरांमध्ये संपूर्ण महिनाभर हवा दूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ( Mumbai Pollution)

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण ही चारही औद्योगिक क्षेत्र आहेत. रज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि क्रेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेचा अहवाल जाहिर केला आहे. यासाठी वाहनांचा धूर, कचरा ज्वलन, बांधकाम अशा गोष्टींमुळे प्रदूषणात मोठी वाढ होताना दिसत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०२ दिवस

साधारण प्रदूषण - १३ दिवस

जास्त प्रदूषण - १६ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

नवी मुंबई

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ०१ दिवस

साधारण प्रदूषण - १८ दिवस

जास्त प्रदूषण - १२ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

ठाणे

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - १४ दिवस

जास्त प्रदूषण - १३ दिवस

धोकादायक प्रदूषण - ०३ दिवस

कल्याण

चांगला निर्देशांक - ० दिवस

समाधानकारक - ० दिवस

साधारण प्रदूषण - २२ दिवस

जास्त प्रदूषण - ०९ दिवस

धोकादायक प्रदूषण - ० दिवस

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या पैकी ठाणे शहारामध्ये हवेत जास्त प्रमाणात प्रदूषण आढळले आहे. ठाण्यात साधारण प्रदूषण १४ दिवस, जास्त प्रदूषण १३ दिवस आणि धोकादायक प्रदूषणाची तीन दिवस नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT