Manoj Jarange Patil Saam tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange Patil: डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

Maratha Aarakshan Andolan: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताच त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधत त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले.

  • हजारो मराठा बांधवांनी मुंबईत मोठी गर्दी केली आहे.

  • 'आरक्षण मिळेपर्यंत हलणार नाही' असा जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.

  • आंदोलकांना शांततेत राहण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे जरांगेंचे आवाहन.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर दाखल होत आमरण उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले. 'सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करायचे.', असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला. 'आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही.', असे देखील आवाहन मनोज जरांगेंनी सर्वांना केले.

मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावरून सांगितले की, 'माझ्या आमरण उपोषणाला १० वाजल्यापासून सुरूवात झाली. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही. आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही. आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला आता पर्यंत्न करायचे आहेत.'

सरकारने सहकार्य केल्याबद्दल जरांगेंनी त्यांचे आभार मानत सांगितेले की, 'आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलो आणि आपलं उपोषण सुरू आहे. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि मुंबई जाम करणार होते आणि मुंबई जाम केली पण. आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुकही केले. आता आपली जबाबदारी आहे. आपणही सहकार्य करूया.'

जरांगेनी मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले की, 'कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केले तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.'

राज्यभरातील मराठा बांधव वाहनांनी मुंबईत आले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यावर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन करत सांगितले की, 'आपल्याला रस्त्यावरील वाहनं काढायची आहेत. पार्किंगमध्ये पोलिस सांगतील तिथे लावायची. स्वत: तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायचे. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही. पोलिस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली हे ऐकायला आलं नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो. समाजाची मान खाली जाईल असे वागू नका.'

आरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, 'डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT