Ajit Pawar Maharashtra Political News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

Ajit Pawar Maharashtra Political News: अजित पवार यांच्या गटाकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे ३६ आमदार नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार, अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Prithviraj Chavan Sensational Claim: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सामील झाला असला तरी, त्यांच्याकडे मुळात किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे.

अजित पवार यांच्या गटाकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे ३६ आमदार नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार, अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे ३६ आमदार दिसले नाहीत. अजित पवार यांच्याकडे ३६ आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो देखील काढला असता. त्यामुळे त्यांच्याकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics) होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

'अजित पवारांसह सर्व आमदार निलंबित होतील'

"ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील. त्यांचं सदस्यत्व रद्द होईल. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे", असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

"अजित पवार यांच्यासह आमदार निलंबित होणार नसतील, तर त्यांच्याकडील ३६ आमदारांचा आकडा त्यांनी दाखवावा. हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे, विधानसभा अध्यक्ष कशाची वाट पाहत आहे? असा सवाल करतानाच हा संपूर्ण पक्षपातीपणा आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

Maharashtra Politics : आमची लोक वाघाची शिकार करायची, आता...; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: मुंब्रा येथील इमारतीच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर सिलिंगचे प्लास्टर पडले

SCROLL FOR NEXT