MAHARASHTRA MONSOON UPDATE: IMD FORECASTS DELAYED RAINFALL, YELLOW ALERT ISSUED FOR VIDARBHA DISTRICTS Saam Tv
मुंबई/पुणे

Monsoon Update : उकाड्याने नागरिक हैराण! मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाचा वर्तवला अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती मंदावली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती ठप्प

  • काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

  • हवामान विभागाचा यलो अलर्ट

  • मॉन्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

  • मान्सून दखल होण्यासाठी जुलै उजडणार

Maharashtra Today Weather Update News राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असून, पावसाअभावी अनेक भागांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा संपायला आला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात मॉन्सूनची प्रगती ठप्प झाली आहे. imd च्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून येण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक उष्णता व दमट हवामानाचा सामना करत आहेत. हवामान विभागाने आज राज्यात उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसादरम्यान आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णतेची तीव्रता आणि हवेत असलेला दमटपणा कायम राहणार असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. अरबी समुद्रात मॉन्सून अडखळल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांहून अधिक काळ पुढे सरकलेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रगती केली होती. मात्र, त्यानंतर त्याची गती मंदावल्याचे दिसून आले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या आगमनात होत असलेल्या विलंबामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला जायची गरज नाही! हे 5 व्यायाम केल्याने मांड्यांवरची चरबी होईल कमी

Monsoon Waterfall : उंचावरून कोसळणारा दुधासारखा पांढरा शुभ्र धबधबा, निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार आहे तरी कुठे?

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पुण्याच्या तापमानात देखील होणार वाढ

Blood Pressure Tips: चहा प्यायल्यानंतर BP तपासताय? सावधान! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Famous Actor : "फसवणूक करून पत्नीच्या अकाउंटमधून दोनदा पैसे गेले..."; प्रसिद्ध अभिनेता सायबर क्राइमचा शिकार, सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग

SCROLL FOR NEXT