mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

दोघांचे भांडण सोडवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावातला प्रकार

अजय दुधाणे

अंबरनाथ - गावातल्या दोन जणांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या इसमाला जीव गमवावा लागल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावात घडलीये. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात आंभे गाव आहे. या गावात राहणाऱ्या अभिमन्यू भाग्यवंत आणि गंगाराम भाग्यवंत या दोघांमध्ये २० मे रोजी सकाळी भांडण सुरू होतं. हे भांडण सोडवण्यासाठी काथोड भाग्यवंत हे मध्ये पडले.

हे देखील पाहा -

मात्र काथोड आणि अभिमन्यू यांचे आधी एकदा किरकोळ वाद झाले असल्यानं अभिमन्यू याला त्यांचा राग आला आणि त्यानं लाकडी दांडक्यानं काथोड भाग्यवंत यांच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काथोड यांना आधी उल्हासनगरच्या शासकीय माध्यवरी रुग्णालयात, तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी २७ मे रोजी काथोड भाग्यवंत यांचा मृत्यू झाला.

यानंतर पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. मलंगगड परिसरात सातत्यानं गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं या भागात एखाद्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची गरज यानंतर व्यक्त होते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT