Ghodbunder Highway  Saam Tv
मुंबई/पुणे

Ghodbunder Highway: ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार! घोडबंदर महामार्गाबाबत महत्त्वाची अपडेट

Thane Ghodbunder Highway Opening Date: घोडबंदर रोडवरुन जाणे म्हणजे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावर तासनतासन ट्राफिक असते. दरम्यान, या वाहतूक कोंडीपासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. घोडबंदर महामार्ग लवकरच सुरु होणार आहे.

Siddhi Hande

ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी

घोडबंदर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

२०२६ जानेवारीमध्ये होणार सुरु

प्रताप सरनाईकांची घोषणा

नवी मुंबई, कोकण, अहमदाबाद कनेक्ट होणार

ठाणेकरांची आता वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. आता बहुप्रतिक्षित घोडबंदर हायवे लवकरच सुरु केला जाणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये हा हायवे सुरु केला जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत या हायवेवरुन जाऊ शकतात.

नवीन वर्षात सुरु होणार घोडबंदर महामार्ग (Ghodbunder Highway Innauagration Date)

घोडबंदर परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. तासनतास वाहने एकाच जागेवर उभी असतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, आता या घोडबंदर महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे.

घोडबंदर महामार्ग जानेवारी २०२६ मध्ये सुरु होईल. तोपर्यंत सर्व प्रलंबित कामे पुर्ण केली जातील. यामुळे मुख्य रस्त्यावरील प्रवास सुरळीत होणार आहे, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहेत.

गुजरात, उत्तर महाराष्ट्र, कोकणाला जोडणार

ठाणे शहरातून हा घोडबंदर महामार्ग जाणार आहे. हा हायवे मुंबई ईशान्य, पश्चिम उपनगरे गुजरात, उत्तर महाराष्ट्र, नवी मुंबई आणि कोकण या प्रमुख प्रदेशांना जोडला जाणार आहे. त्यामुळे हा प्रवास एकदम सुसाट होणार आहे. घोडबंदरवरुन थेट मुंबईत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

ठाणे शहराच्या हद्दीत महामार्गाची दुरुस्ती केली जात आहे. दोन्ही मार्गांच्या लेन मुख्य कॅरेजवेमध्ये विलीन केल्या जात आहेत. या महामार्गाच्या काँकिटिकरणाचे काम सुरु आहे. यामुळे लेन बंद आहेत. यामुळे शहरातून बाहेर जाण्याची वाहतूक कोंडी होत आहे.

प्रताप सरनाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामात गायमुख विभागातील पुनर्बांधणी, सर्व्हिस रोडचे रुंदीकरण, पाण्याची पाईपलाइन टाकणे तसेच वीजवाहिन्यांचे स्थलांतर याचा समावेश आहे. वाहतूक पोलिस सामाजिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून पुनर्बांधणी आणि उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम करतील, जेणेकरुन प्रवाशांना त्रास होत नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महानगरपालिकेकडे सोपवेल. यानंतर हा महामार्ग प्रवाशांसाठी सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT