Exam saam tv
मुंबई/पुणे

HSC-SSC Exam: कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाचा दणका, कॉपी करण्याचा विचारही करु नका, अन्यथा...

परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन जाधव

पुणे : दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थी देखील परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. विद्यार्थ्यांसोबत बोर्ड देखील परीक्षेसाठी सज्ज झालं आहे. दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या असा शिक्षण मंडळाचा आग्रह आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने कडक पावलं उचलण्याचा पवित्रा घेतला आहे.

कॉपी बहाद्दरांना दणका देण्याची तयारी आता शिक्षण मंडळाने केली आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असा इशारा दिला आहे.

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार?

राज्य शिक्षण मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे. आतापर्यंत 10 मिनिटे उशीर झाला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु याचा गैरफायदा विद्यार्थ्यांकडून घेतला जात असल्याचं निदर्शनास आल्याने मंडळाने हा निर्णय घेतला आहे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : धुक्याने घात केला! प्रवाशांनी भरलेल्या बसचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट दरीत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Shirdi One Day Trip: वंदे भारतचा गारेगार प्रवास, सकाळी मुंबईत, दुपारी साई बाबांच्या दारात, वाचा खर्च अन् ट्रेनचा टायमिंग

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राजकीय दौऱ्याची सुरूवात, साताऱ्यात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक

मुंबईहून पुण्याला फक्त ४८ मिनिटात, केंद्र सरकारची मोठी घोषणा, वाचा काय होणार फायदा

40 वर्षाखालील तरुणांना कॅन्सरचा धोका; पोटासंबंधीत 'ही' लक्षणे दुर्लक्षित करु नका, Colorectal Cancer म्हणजे काय?

SCROLL FOR NEXT