Sakshi Sunil Jadhav
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने राहू- केतूशी संबंधित त्रास कमी होतात आणि घरात सुख-शांती नांदते. यंदा नाग पंचमी १७ ऑगस्ट रोजी असणार आहे.
काही ज्योतिषीय परंपरांनुसार लोखंडी तवा आणि कढई हे राहूचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांचा वापर टाळल्याने नकारात्मकता कमी होते.
श्रद्धेनुसार, लोखंडी तवा आगीवर तापवल्याने राहू आणि मंगळाच्या ऊर्जेचा प्रतिकूल संयोग निर्माण होऊ शकतो. त्याने भांडण वाढू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं शुभ मानलं जातं. तर नागपंचमीला साधा आणि सात्विक स्वयंपाक केला जातो.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे शुभ मानले जाते. या दिशेतील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी नागपंचमीला साधा आणि सात्त्विक स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला जातो.
बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला तळलेले पदार्थ न बनवता उकडेले किंवा वाफवलेले पदार्थ खाण्याची प्रथा असते.
काही वास्तू मतांनुसार लोखंडाचा संबंध शनी आणि राहुशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी लोखंडी भांड्यांचा कमी वापर करावा अशी परंपरा आहे.
लोकमान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी काही धार्मिक नियम पाळल्यास घरातील महिलांचे आरोग्य आणि कुटुंबातील सकारात्मक वातावरण टिकून राहते, असे मानले जाते.
नागदेवतेची पूजा करावी, दूध किंवा फुले अर्पण करावीत, घरात स्वच्छता ठेवावी, सात्त्विक आहार घ्यावा आणि गरजूंना अन्नदान करणे हे शुभ मानले जाते.
नागपंचमी हा श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याचा सण आहे. तवा किंवा कढई न वापरण्याची प्रथा ही काही ज्योतिष आणि वास्तु परंपरांमध्ये सांगितली जाते, परंतु ती धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.