Ajit Pawar And Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : बारामतीत पवार कुटुंबीयांचे यंदा दोन पाडवे का? अजितदादांनी सांगितलं कारण,VIDEO

sharad pawar vs ajit pawar : बारामतीत पवार कुटुंबीयांचे दोन पाडवे साजरे होत आहेत. यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

मंगेश कचरे

बारामती : देशासहित राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीत दिवाळी आल्याने राजकीय पक्षांचा उत्साह दुपट्टीने दुणावला आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामतीतही दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी पवार कुटुंबीयांकडून एकच दिवाळी पाडव्याचे आयोजन केलं जातं. मात्र, यंदा बारमतीत पवार कुटुंबीयांचे दोन पाडवे पाहायला मिळाले. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या पाडव्यावर अजित पवारांनी भाष्य केलं.

बारामतीत यंदा शरद पवारांचा वेगळा पाडवा पाहायला मिळाला. तर अजित पवारांचा दुसरा पाडवा पाहायला मिळाला. बारामतीमधील दोन पाडव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबत अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, 'एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये. लोकांना ताटकळत बसायला लागू नये. यामुळे आम्ही पाडवा वेगळा घेतला आहे. आम्ही गर्दी तुरळक करण्याकरिता हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही हा पाडवा वर्षानुवर्ष काटेवाडीतच करत आलो आहोत'.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना अजित पवारांनी म्हटलं की, 'राज्यातील जनतेला माझ्याकडून खूप शुभेच्छा. वसुबारसने दिवाळीची सुरुवात होते, तुळशीच्या लग्नाने दिवाळीचा शेवट होतो'.

गावभेटीच्या दौऱ्याविषयी भाष्य करताना अजित पवारांनी म्हटलं की, 'एका दिवसात एवढी गावे होत नाहीत. माझा दौरा हा चुकीचा झालेला आहे. त्यामुळे मी पुढील गावातील दौरा रद्द केला असून तो भाऊबीजेच्या दिवशी पुढचा दौरा पूर्ण करेल'.

अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केलं. 'लाडकी बहीण सुरू योजना चालू राहण्यासाठी सगळ्यांनी बहुमत महायुती सरकारला दिले पाहिजे,असे आवाहन नागरिकांना आम्ही करत आहोत, असे अजित पवारांनी सांगितले.

'लोकसभेला वेगळा निकाल लागला. तो लोकांचा अधिकार आहे. मात्र मतदारांना बळजबरी कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

दौंड विधानसभेत महायुतीचे दोन उमेदवार आहेत. भाजपसहित अजित पवार गटाच्या उमेदवाराकडेही एबी फॉर्म आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, 'महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक होईल. यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. देवेंद्र फडवणीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि मी काल बसलो होतो. याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल. ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांचे फॉर्म मागे घेण्याकरिता जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत'.

दौऱ्याविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, 'एका दिवसात जास्तीत जास्त 25 गावे होऊ शकतात. दिवसभरात येण्या जाण्यात वेळ खूप जातो. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्यावा लागतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT