Palghar News, Talasari Fishermen saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : तलासरी, डहाणूतील मच्छिमारांची पाकच्या तुरुंगातून सुटका

रुपेश पाटील

Palghar News : पाकिस्तानातून सुटका झालेल्या 198 भारतीय खलाशांपैकी पाच जण हे पालघर जिल्ह्यातील आहेत. आज (बुधवार) ते त्यांच्या मूळ गावी पोहचले. यावेळी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. (Maharashtra News)

पाकिस्तानच्या लांडी तुरुंगातून 11 मे रोजी या पाचही खलाशांना सोडण्यात आले होते. या पाच खलाशांमध्ये जयवंत जाना पाचालकर ,जितेश जयवंत पाचालकर, विलास महादू कोंढारी हे तीन खलाशी (palghar) तलासरी तालुक्यातील आहेत. तर जितेश राघू दिवा, अर्जुन काकड्या डावऱ्या हे दोन खलाशी डहाणू तालुक्यातील आहेत.

यामध्ये पाचालकर पिता पुत्रांचा समावेश असून हे दोघेही डिसेंबर 2019 पासून शिक्षा भागवत होते. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना वाघा बॉर्डरहून पंजाब आणि त्यानंतर गुजरात राज्यातील वेरावळ येथे आणण्यात आले.

सोमवारी रात्रीपर्यंत या खलाश्यांची चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांना बोट मालकाकडे सोपविण्यात आले. आज (बुधवार) हे पाचही खलाशी आपली शिक्षा भोगून आपल्या घरी पोहोचले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT