Thane News Saam TV Marathi
मुंबई/पुणे

धक्कादायक!'२१ वर्षांपर्यंत थांब' म्हणताच १९ वर्षीय प्रियकराने संपवलं आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

19-year-old Thane youth die by suicide over marriage? : ठाण्यात १९ वर्षाच्या तरुणाने प्रेम विवाहासाठी कुटुंबियांनी नकार दिल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षे थांबण्यास सांगितल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Namdeo Kumbhar

Youth Suicide for Marriage: नांदेडमधील ऑनर किलिंगची भयानक घटना ताजी असतानाच ठाण्यातून आता हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मुलाला गर्लफ्रेंडसोबत लग्न करायचे होते, घरच्यांनी त्याला २ वर्षे थांबण्यास सांगितले. तू १९ वर्षांचा आहे, आणखी २ वर्षे थांब.. त्यावर मुलाचा संताप अनावर झाला अन् आयुष्य संपवले. या घटनेनंतर ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून अहवालाची वाट पाहत आहेत. (Youth suicide cases related to love and family pressure in Maharashtra )

मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता. दोघांना लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने ही गोष्ट कुटुंबियांना सांगितली. पण कुटुंबीयांकडून त्याला २ वर्षे थांबण्यास सांगण्यात आले. तू अजूनही १९ वर्षांची आहेस, २१ वर्षांचा होईपर्यंत थांब, असे कुटुंबाने त्याला सांगितले. हे ऐकताच त्या तरुणाला खूप वाईट वाटले. तो खचला अन् रागाच्या भरात त्याने गळफास घेतला. कुटुंबियांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून याची नोंद करण्यात आली. कुटुंबियांची चौकशी करण्यात येत आहे.

३० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. तरुणाने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची नोंद अपघात म्हणून केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या आंतरजातीय ऑनर किलिंगनंतर प्रेम प्रकरणाच्या या घटनेने तरूणाईच्या मानसिक स्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आत्महत्या करण हा मार्ग असू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलसांच्या प्राथमिक तपासात या घटनेबाबत धक्कादायक कारण समोर आलेय. १९ वर्षांचा तरूण एका मुलीवर प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबतच लग्न करायचे होते. मुळचे झारखंडचे असणारे हे कुटुंब ठाण्यातील डोंबवलीमध्ये राहायचे. वय कमी असल्याने त्याला कुटुंबियांकडून २ वर्षे थांबण्यास सांगितले. पण त्याला ही गोष्ट खटकली अन् त्याने आयुष्य संपवले. दरम्यान, मानपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

टीप - आत्महत्या करणं हा कोणत्याही अडचणीवर अथवा वाईट गोष्टींवर पर्याय नाही. आत्महत्येचा विचार करत असाल तर मानसोपचारतज्ज्ञांशी बोलून उपाय शोधू शकता. यासाठी सरकारी हेल्पलाइन नंबर १४४१६ आहे. २४x७ संपर्क साधता येतो. इतर अनेक हेल्पलाइन नंबर उपलब्ध आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हेल्पलाइन - १८००-५९९-००१९, मुंबई - ०२२- २४१३१२१२ यावर संपर्क करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

VitaminB12: B12 च्या कमतरतेमुळे डिप्रेशन येतं का? संशोधनातून मिळाली माहिती

Marine Drive Tunnel: मुंबईचे पूर्व-पश्चिम समुद्रकिनारे जोडणार! मध्य-पश्चिम रेल्वे अन् मेट्रोखालून खोदले जाणार बोगदे, १५ मिनिटांत मरिन ड्राइव्ह गाठता येणार

Tiger Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून घातली झडप, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?

SCROLL FOR NEXT