Weather Alert Saam Tv
महाराष्ट्र

Weather Update: काळजी घ्या! उन्हानं होरपळ, ११ ते ४ चं ऊन त्रासदायक, का होतेय तापमानात वाढ?

महाराष्ट्रातील तापमान ३७ ते ३९ अंशाच्या घरात असणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

weather report :मुंबईत उकाडा वाढत चालला आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गुलाबी थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळेत घामाच्या धारा सुरू झाल्यात. अशात आता पुढचे दोन दिवस मुंबईकरांसाठी खुप महत्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रातील तापमान ३७ ते ३९ अंशाच्या घरात असणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा या राज्यांत देखील उन्हाचा तडाखा वाढणार आहे. (Latest weather report)

मुंबईतील उपनगरांमध्ये देखील उष्णता वाढत चालली आहे. तसेच तापमाणात सकाळी ९ नंतर मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर पडूनका असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

पुढच्या ४ दिवसांमध्ये उत्तरमहाराष्ट्रातील काही ठिकाणी उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे त्वचेचे आजार, उष्माघात अशा समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचे असणार आहेत.

उष्णाच्या तडाक्यासह हवेतील प्रदूषण पातळी देखील वाढत आहे. सोमवारी मुंबईतील हवेची पातळी अतिशय खाली घसरली आहे. २५६ AQI दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह उपनगरांच्या हवेच्या गुणवत्तेची देखील माहिती दिली आहे.

तापमानात का वाढ होत आहे ?

चक्रीवादळविरोधी परिसंचरण आणि निरभ्र आकाश यामुळे तापमानाचा पारा अचानक वाढला जातो. तसेच सागरी वारे सुरू होण्यास विलंब म्हणजेच समुद्रावरून येणारे पश्चिमेचे वारे किनारी भागात उशिराने सुरू होत आहेत.

दुपारपर्यंत पूर्वेकडील वारे वाहत आहेत तर समुद्राच्या वाऱ्यामुळे किनारी भागातील तापमान दुपारच्या वेळी खाली येत आहे. त्यामुळे सध्या तापमानात वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT