10th result 2026 google
महाराष्ट्र

SSC Result : दहावीच्या निकालाचा धक्का, कमी गुण मिळाल्याने ३ विद्यार्थ्यांची आत्महत्या

SSC Student Sucide Case News : दहावीच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. कमी गुण, नापास होण्याच्या भीतीने हे टोकाचं पाऊल विद्यार्थ्यांनी उचललं आहे.

Sakshi Sunil Jadhav

दहावीच्या परिक्षेचे निकाल ८ मे रोजी लागले. याही वर्षी मुलींनीच बाजी मारली. पण काही विद्यार्थ्यांना परिक्षा म्हंटलं की, टेन्शन येतंच. पण यामुळे आत्महत्या हे खूप मोठं आणि चुकीचं पाऊल अनेक विद्यार्थी उचलत आहेत. पुढे आपण कोणकोणत्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.

धारावीत विद्यार्थ्याची आत्महत्या

दहावीच्या निकालानंतर आनंदाचं वातावरण असतानाच धाराशिवमधून एक हृदयद्रावक घटना घडली. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम येथे राहणाऱ्या आदित्य नितीन जाधव या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. आदित्य हा भूममधील रवींद्र हायस्कूल येथे दहावीत शिक्षण घेत होता. नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला 63.60 टक्के गुण मिळाले होते. पण ते त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्याने राहत्या घरी साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली.

संभाजीनगरमध्ये आत्महत्या

दहावीच्या बोर्ड परिक्षा लागण्याच्या तासभर आधी म्हणजे ८ मे २०२६ रोजी सकाळी संभाजीनगरमधील पुंडलिक येथील परिसरात एका विद्यार्थ्याने गळफास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नापास होण्याच्या भीतीने सोहम ज्ञानेश्वर मोरे या विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नागपुरातील विद्यार्थीनींची आत्महत्या

दहावीच्या निकालानंतर नागपूरही हादरलं. एका विद्यार्थीनीने घरात गळफास घेतला. यासगळ्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि मित्रपरिवार आणि शाळेतही शोककळा पसरली आहे. दहावी-बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढत असल्याचं चित्र अनेकदा समोर येतं. गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. मानसिक तणावाच्या काळात मुलांशी संवाद ठेवणं आणि त्यांना भावनिक आधार देणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT