माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील नागरिकांमध्ये धगधगती आग पेटली आहे. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी राजकीय नेते देखील मैदानात उतरले आहेत. काही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी राज्य पिंजून काढलंय. तसेच आमदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले. अशातच सुरेश धस यांनाच मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष्य केलं आहे.
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालंय, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर टीकेची तोफ डागली. हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता आले असते. असंही पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाच्याही प्रश्नांवर उत्तर द्यायचं कारण नाही. मस्साजोग प्रकरणात एसआयटी पथक नेमा, अशा आशयाचे पत्र मी दिलं आहे. असं माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
तसेच, कोणतीही गोष्ट घडल्यावर काही नेत्यांना राजकारण करायचं असतं. असा अप्रत्यक्ष आरोपीही पंकजा मुंडे यांनी केला आहे. सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं आहे. या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी झाली. त्यामुळे बदनामी बीड बदनाम झालं असल्याची खळबळजनक आरोप पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे.
बीडमधील प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता आले असते. बीडचे नागरिक स्वाभिमानी आहेत. उसतोडी करून पोट भरतात. अशा घटनेने जिल्हा बदनाम झालं आहे. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर सुरेश धस काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.