Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, कारण काय?

Pandharpur News update : विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

भरत नागणे

पंढरपूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भाविकांची वाढती संख्या विचारात घेत मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे, यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासंतास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे. यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही, असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.

आता मिळणार २४ तास दर्शन

आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. आषाढी यात्रेनिमित्तभाविकांना मंदिर समितीमार्फत मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन व्हावे, यासाठी 27 जूनपासून २४ तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.

मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही महत्वाची माहिती दिली. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अक्ष्यक्षतेखाली झाली. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT