Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis Saam
महाराष्ट्र

Kharat Case : मुख्यमंत्री फडणवीसांची खुर्ची घालवण्यासाठी अघोरी पूजा; ३८ आमदारांनी खरातकडे बोट कापलं, महाराष्ट्राला हादरवणारे दावे

Jitendra Awhad statement on CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ३८ आमदारांनी अघोरी पूजा करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खुर्चीवर डोळा ठेवला असल्याचा दावा समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

38 MLAs black magic ritual allegation Maharashtra : देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपदापासून दूर करण्यासाठी राज्यातील अनेक आमदारांनी खरातकडे जाऊन पूजा केल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे विधानसभेत मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सामाजिक क्षेत्रातही संताप व्यक्त केला जात आहे. खरात प्रकरणात दररोज नवनवीन दावे केले जात आहेत. खरातला वाचवण्यासाठी पैसे घेतले जात असून मोठे अधिकारी तिथे लोटांगण घालत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला. अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अशोक खरात प्रकरणावरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात केवळ काळी जादू किंवा अघोरी प्रथांचाच समावेश नाही, तर थेट सत्तेच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.

अशोक खरातकडे जाऊन काही जण अघोरी पूजा करत होते. या पूजेचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे हा होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. "खरातकडे जाऊन ३८ आमदारांनी करंगळ्या कापल्याची यादी माझ्याकडे आहे, योग्य वेळी नावे जाहीर करेन," असा दावाही आव्हाड यांनी केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सत्तेसाठी अघोरी विद्येचा वापर करण्याच्या दाव्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

अशोक खरातबद्दलची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आणि पोलिसांना असायला हवी होती, मात्र हे पोलिसांचे 'इंटेलिजन्स फेल्युअर' असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला. तसेच, या आरोपीला वाचवण्यासाठी काही मोठ्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "या सर्व प्रकाराची आणि खरातसोबत झालेल्या बैठकांची माहिती मुख्यमंत्री महोदयांना सहा महिन्यांपूर्वीच मिळाली होती," असा दावाही आव्हाडांनी यावेळी केला.

अशोक खरातने २००७ मध्ये बाळू तुपे नावाच्या पत्रकाराची पहिली हत्या केली होती, असा उल्लेख आव्हाडांनी केला. इतका गंभीर गुन्हेगारी इतिहास असतानाही खरातच्या देवस्थानला विकासकामांसाठी सरकारी निधी दिला गेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. सिन्नर येथील खरातच्या देवस्थानसाठी सरकारी तिजोरीतून कमानी आणि टाक्या बांधल्या गेल्या. एका काळ्या जादू करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे राजमान्यता मिळणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला घातक असल्याचे आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

मोठी बातमी! फरार सत्ताधारी आमदाराच्या आवळल्या मुसक्या; अत्याचार प्रकरणी पोलिसांची थेट दुसऱ्या राज्यात घुसून कारवाई

Ashok Kharat: अशोक खरातचं पहिलं कांड; २००७मध्ये पत्रकाराला संपवलं; जितेंद्र आव्हाडांनी उघडकीस आणलं भोंदू बाबानं घडवलेलं हत्याकांड

कुठे पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग, कुठे सरकारी कार्यालये बंद! आखाती युद्धामुळे जगात लॉकडाऊनची स्थिती

Pediatric Kidney Cancer: 2 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये वाढतोय धोका, लहानग्यांमध्ये दिसणाऱ्या किडनी कॅन्सरची लक्षणं वेळेत ओळखा

SCROLL FOR NEXT