Vijaykumar Gavit News Saam tv
महाराष्ट्र

Vijaykumar Gavit News: बालमृत्यू, माता मृत्यू झाले त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी दिले संकेत

Nandurbar News बालमृत्यू, माता मृत्यू झाले त्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी दिले संकेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
 : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात (Nandurbar) असून घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार. असे संकेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी दिले आहेत. (Tajya Batmya)

राज्यातील सर्वाधिक बालमृत्यू आणि माता मृत्यू हा नंदुरबार जिल्ह्यापासून जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात येत असतात. मात्र या उपायोजना करत असताना यंत्रणा काही अंशी अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी जिल्ह्यातील परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध आरोग्य समस्यांवर चर्चा करण्यात आली.  

आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी पाहिजे, त्या उपाययोजना केल्या जातील. हलगर्जीपणा करणारे अधिकाऱ्यांवर कारवाईच्या इशारा या वेळेस देण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांच्यासोबत विविध सामाजिक कार्यकर्ते आणि गाभा समितीचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT