Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : पैनगंगा नदी कोरडी पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई; पाणी सोडण्याची गावकऱ्यांची मागणी

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : यंदाचा उन्हाळा दाहकता निर्माण करणारा ठरणार आहे. मुळात यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. यात (Nanded) नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने ही पाणी टंचाई उद्भवली आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (Himayatnagar) तालुक्यातील पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास २५ गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. एकंबा गावासह आजूबाजूच्या गावांमध्ये पाण्याची टंचाई (water Crisis) भासू लागली आहे. पैनगंगा नदी काठावरील या गावांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पैनगंगा नदी कोरडी झाल्यामुळे बोर आणि विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झालीय. शेती, जनावरांच्या आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

नदीत पाणी सोडण्याची मागणी 

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता आणि यंदा असलेल्या पाणी टंचाईने पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जनावरांसाठी पाणी मिळावे यासाठी इसापूर धरणरून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी या नदीकाठच्या गावकऱ्यांनी केली आहे. पाणी सोडल्यानंतर किमान विहिरींना काहीसे पाणी येऊ शकेल व जनावरांची तहान भागविता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT