naam foundation saam tv
महाराष्ट्र

Naam Foundation: महाबळेश्वरातील शेतक-यांसाठी 66 जेसीबी, 6 पोकलेन, 4 डंपर, 3 ट्रॅक्टर दाखल

ही संपुर्ण यंत्रणा गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम करणार आहे.

ओंकार कदम

सातारा : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊसाने सातारा जिल्ह्यातील असंख्य गावांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल 1580 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. शासनाच्या तोडक्या यंत्रणेमुळे आजही असंख्य गावांना मदत मिळाली नाही. परंतु सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) आणि नाम फाऊंडेशनच्या (naam foundation) यांच्या सहकार्याने महाबळेश्वर (mahableshwar) तालूक्यातील बाधित गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या लोकांचे झालेले नुकसान पाहता त्यांना हातभार लावण्यासाठी तब्बल 66 जेसीबी, 6 पोकलेन, चार डंपर आणि तीन ट्रॅक्टर असे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ही संपूर्ण यंत्रणा महाबळेश्वरात पोहचली आहे. ही संपुर्ण यंत्रणा गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम सुरु करणार आहेत.

ही मोहिम सुमारे 15 दिवस सुरु राहणार असून या यंत्रणेसाठी डीपीडीसीमधून डिझेलची सोय करण्यात आली आहे. साधारण जुन जुलै महिन्यात या भागात भात लागवडीसाठी लगबग सुरु होते आणि या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भात शेती करता यावी या करीता त्यांना शेत तयार करुन देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे अशी माहिती राजेंद्रकुमार जाधव (प्रांताधिकारी, वाई) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT